google-play Create Biodata For Free

प्रेम आणि विवाह

प्रेम, किती गोंडस, लहान पण वजनदार, व्याकरणात्मक सोपा पण अर्थाने अवघड, सगळंच काही एका शब्दात. एका अडीच अक्षरी शब्दात.

आजवर इतक्या कहाण्या आपण ऐकल्या, इतकी पुस्तकं, कादंबऱ्या आणि सिनेमे तर काही विचारूच नका. प्रेमाची महती आपापल्या परीने प्रत्येकाने सांगितली. पण खऱ्या आयुष्यात प्रेम आणि विवाह, याचे फार चांगले अनुभव कुणाच्या गाठी नाहीत. मुळात हा विवाह फसतो कुठे!

पूर्वी इतकी लग्न व्हायची आणि अगदी बोटावर मोजण्याइतकी मोडायची. आता परिस्थिती उलट होऊ लागलीये. या सगळ्या मागे मुख्य कारण म्हणजे नात्यातली नाविन्यता. सगळ्यांना माहीत आहे, की एकच एक काम करून आपल्याला त्याची सवय होते, पण कालांतराने कंटाळाही येतो. जसं प्रत्येक दैनंदिन जीवनात आपण नाविन्यता शोधत असतो, तशी वैवाहिक आयुष्यात पण शोधतोच. प्रेम विवाहामध्ये जोडीदाराची ओळख आधीच इतकी असते, की नाविण्यातेपेक्षा रूटीनच जास्त होत. अर्थात दोघांना एकमेकांची खूप सवय असते, पण नात्याचं नाव बदलत, जबाबदारी वाढते, स्वातंत्र्य कमी होत. या सगळ्यांचा शेवट छोटे वाद आणि मोठ्या भांडणांत होत. अर्थात प्रत्येक गोष्टींना अपवाद असतो. अशा सगळ्या परिस्थतीतही खूप सेंसिबल निर्णय घेऊन कपल्स खूप प्रेमाने नांदतात, पण ती काही मोजकीच.

पारंपारिक लग्न (अर्थात आपलं अरेंज मॅरेज) याबाबतीत फार वेगळं आहे. कारण जोडीदाराचा प्रत्येक पैलू नव्याने पाहत असतो, अनुभवत असतो. आपली आवड निवड, आपलं मत मांडत असतो, शक्य तितकं जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असतो. सगळ्यात महत्वाचं म्हणजे या गोष्टी नवीन नात्याची जबाबदारी सांभाळत करत असतो. एखादी गोष्ट नाही आवडली तरी आपण जोडीदाराच्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करतो. त्याच्याशी उगाच वाद घालण्यापेक्षा त्याच मन जाणण्याचा प्रयत्न करत असतो. कधी डोळ्यांत पाहून, तर कधी नुसत्या खुणेनेच. गंमत म्हणजे हे सगळं होत असताना बराचसा वेळ निघून जातो, काळाची चाक पुढे जात आणि कधी पती पत्नी नात्याचं मैत्रीत रूपांतर होत, त्यांचं त्यांनाही कळत नाही.

फार सूक्ष्म विचार करून आपल्या पूर्वजांनी काही रिती रूढ केल्या आहेत. काळजीपूर्वक विचार केला तर त्यातील बऱ्याच रितींमध्ये तथ्य सापडेल. अजूनही वेळ आहे, आजुबाजूच जग काहीतरी करतंय म्हणून आंधळेपणाने फॉलो करण्यापेक्षा एकदा स्वतः विचार करा.

लग्न नातेवाईक आणि स्थळ

नमस्कार!

आपल्या भारतीय संस्कृतीत लग्न म्हणजे अतिशय जिव्ह्याळ्याचा विषय. लग्न म्हणजे दोन जिवांचं नाही, तर दोन कुटुंबाचं मिलन. आणि अशा या लग्नाच्या बेडीत दोन जीवांना बांधणारे, सर्वच अगदी उत्साही असतात. लग्नाचा विषय छेडण्यापासून, ते जुळवण्यापासून तर अगदी अक्षता टाकण्यापर्यंत. सर्व काही कसं, अगदी हौशीने. मुला-मुलींच्या आई बाबांपेक्षा अवचित उगवणाऱ्या नातेवाईकांचा यात सिंहाचा वाटा असतो. थोडंसं तऱ्हेवाईक वाटेल, पण खरंच आहे की! लग्न झालेल्यांना काही वेगळं विचारायला नको.

मुला-मुलींच्या संगोपणापसून, संस्कार लावणे, त्यांना शिकवणे, लहानाचं मोठं करणे आणि त्याने न सांगता त्याला हवं असलेलं सर्व काही पुरवणे, याचा विचार मुलाचे आई बाबा यांहून जास्त चांगला कोण करत असत. पण जेव्हा लग्न, या आयुष्यातील सो कॉल्ड सर्वात महत्वाचा विषय निघतो, तेव्हा अचानक तो जागतिक तापमान वाढीपेक्षा पेचाचा प्रश्न होऊन पडतो. आणि अर्थातच त्याचं निरसन करण्यासाठी न विचारता शेकडो हात सरसावतात. बहुतांशी वेळा, मुलाला किंवा मुलीला किती चांगला आणि अनुरूप जोडीदार मिळाला, यापेक्षा आपण किती उत्तम पद्धतीने संबंध जुळवून आणले, आणि कामगिरी बजावली, याचा टेंभा मिरवण्यासाठी रशाकशी सुरू होते.

बिचाऱ्या मुला-मुलींच्या आवडीचा, किंवा त्यांच्या आवडीबद्दल त्यांच्या पालकांचं मत कुणी समजूनच घेत नाही. स्थळ सुचवण्यात गैर नाही. जुळवून आणलेल्या लग्नात जितके नाती – गोती जास्त तितकी जास्त आणि मुख्याकरून खात्रीशीर स्थळं पाहण्यात येतात. पण आपण आणलेलं स्थळ किती उत्तम आहे आणि ते तू करावसंच यावरच जास्त भर असतो. आणि मग अनेक स्थळं पाहून आणि सततच्या नातेवाईकांच्या भरामुळे, बऱ्याच वेळी असं होत, की आपण होकार देऊनच टाकतो. जास्त काही विचार न करता. मुलं मुली आनंदी होतात, हौशी नातेवाईकांपासून त्यांचा माग सुटला म्हणून, आणि अर्थातच ‘ ते ‘ खूष होतात लग्न जुळवलं म्हणून. आपल्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवून अगदी उत्साहात असते ही मंडळी. विशेष या गोष्टीचं वाटतं, लग्न जुळवताना जितक्या अनपेक्षितणे ही मंडळी समोर येते, तितक्याच वेगाने नंतर दिसेनाशी होते.

शेवटी परत तेच राहतात, मुलगा, मुलगी (अर्थात आता वर वधू) त्यांचे आई वडील!

देव करो, पद्धत कितीही पारंपरिक का असेना. वरील सहा माणसं शेवटपर्यंत आनंदी असायला हवेत. पण बहुतांशी चित्र वेगळंच असतं, सामाजिक दबाव किंवा पीर प्रेशर यामुळे नाहक अनेक जीव भरडले जातात, अगदी कायमचे! कुठेतरी हे थांबायला हवं.

मित्रांनो आणि पालकांनो! आपल्या या अनेक प्रश्नांची खात्रीशीर आणि तुम्हाला पूर्ण पटेपर्यंत प्रयत्न करण्यासाठी आम्ही आलो आहोत. आमची एकच गोष्ट विशेष आहे. आमच्याकडे कोणताही साचा नाही. प्रत्येक मुलगा आणि मुलगी हे वेगळे आहेत आणि अर्थात त्यांच्या पसंतीच्या संकल्पना. आणि प्रत्येकासाठी आम्ही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहणार आहोत. दुसरं विशेष म्हणजे खात्रीशीर माहिती. तुम्हाला दिलेली प्रत्येक माहिती आमच्या विविध पातळ्या ओलांडून आलेली असणार आहे. त्यामुळे त्याची पूर्ण जबाबदारी आमची! आणि हो, एक फार महत्त्वाचं राहिलंच, एखाद स्थळ आवडलं नाही असं तुम्ही सांगितलं, तरी ‘ स्थळ ‘ ला वाईट वाटणार नाही.

तर मग वाट असली पाहताय. आत्ताच नाव नोंदवा. निवड तुमची, विश्वासार्हता आमची.

Why Sthal’s 6 level verification feature is important

In today’s era of Facebook, Twitter, and Instagram you see every other person flaunting his/her life online. But many times the authenticity of the profile goes for a toss as plethora of people keep creating fake profiles. Gauging the genuineness of the profile is sort of a big deal now and in case of a marriage proposal, it is not less than a herculean deed. Taking under consideration such problems Sthal Matrimony designed its 6 level verification system. It is intended to keep only genuine profiles. Fake or Non-Serious profiles give a negative impact on the matchmaking process. We do 6 level verification to keep only genuine profiles on this portal. The brief of 6 level verification is as follows,

Government ID

We verify a government ID (PAN Card or, Aadhar Card or Passport) during the registration process. It helps us filter fake and duplicate profiles.

 

Mobile Number

Mobile number is a primary source of communication. Our system verifies the mobile number given by users to make your connecting process hassle-free.

 

Email ID:

An email is one of the efficient ways to start communication. It gives you a platform to talk in detail without any barriers. We verify the user’s email ID to give you a channel to understand a person better.

 

Company Website

Company details give more information about a person’s career. As part of verification, we verify the company website provided by users.

 

Facebook

Facebook gives a social insight into the interests, lifestyle and other personal aspects of a person. We validate the Facebook profile of users to give you access to prospect’s social life

 

LinkedIn

Exposure to the LinkedIn profile of a prospect gives you all the information about a person’s entire professional life. We verify LinkedIn details of users so you can get the career details of your prospects easily

First meeting guidelines in arranged marriages

In the case of the first meeting in an arranged marriage the prime and the important thing for you is to be yourself and staying honest to the other person.Being yourself helps you to avoid awkward moments which generally happen when you try to pretend to be someone else.

Certain personality traits can be no doubt imbibed later if one is determined but pretending to be something else is much more worst.

You should take note that the Meeting should be more of a conversation than an interrogation. While asking questions the personal boundaries should be taken under consideration and you should not ask questions which you yourself would hesitate or avoid to answer, to maintain the conversation swiftly do not ask questions you yourself would not want to be asked.

In the beginning, start casually, get comfortable and slowly start inclining towards serious questions and make sure you give the hint o another person when you are entering into the territory of serious questions.

Your tone while asking and answering questions should be encouraging enough to get the other person started with a swift conversation along with comfort. The responses to questions relating career, family, and self help you to understand the person’s compatibility better so you should segmentize and frame questions accordingly.

Following are some sample questions categorized:

Self/Personal :

1) Are there any religious, or cultural restrictions or potential issues that might arise from their side of the family?

2) What do you like to do in your free time, your hobbies and interests?

3) What do you think your routine will be like after marriage?

4) Which genres of music do you prefer listening to as favorites and which are your favorite television series and movies?

5) What do you value most in the relationship?

6) What are you looking for in your future spouse?

 

Career/Work :

1) What are your views on work-life balance?

2) What are your future career and job plans?

3) Would you mind if I work after marriage?

4) Are you comfortable with my responsibility towards my parents with respect to emotional and financial help?

5) What is that one thing you are never going to compromise on?

 

Family:

1) Where were you brought up?

2) Who knows you extremely well or is closest to you in your family?

3) What do you think should be my responsibility towards family?

4) What are your views on sharing household work and responsibilities?

5) How could a marriage be successful according to you?

 

All the Best and Happy Matchmaking.

निर्णय कसा घेऊ

” खरंतर बाबा…हे लग्न ठरविण्यापुर्वी मला अनयाशी एकट्यात भेटायला आवडेल…तुम्ही विचार करत असाल की काय एकट्यात भेटायच आहे तर काही भविष्यातील आराखडे सोबतीने आखु शकतो हे ठरवायचे आहे…”असे म्हणुन अनिकेत वसंतरावांच्या कडे आशेने पाहिले.ते विचार करत असताना सुलभाताई चटकन म्हणाल्याच,” अनिकेत…असं काही आमच्या वेळेस नव्हतं तरीही चांगला सुरु आहे ना आमचा संसार?? तुम्हा आजकालच्या मुलांच हे नवीनच खुळ निघालयं…”

अनिकेत खरा विचारात पडला,”पिढी बदलली,अपेक्षा बदलल्यात,मुलींना समानतेचा दर्जा दिला जातोय आणि आपण अजुनही त्याच काळात जगणार का? कधी मला काही अपेक्षा नसतीलही पण तिच्या अपेक्षा मी पुर्ण करु शकलो नाही तर तिचा भ्रमनिरास नको व्हायला.दोघांनी एकमेकांच्या मताचा आदर केल्याशिवाय संसार आनंदी होत नाही,पण मग आईवडिलांना हे समजवायचं कसं?..”

आजकालच तसं हे अतिशय काँमन चित्र आहे.पिढी पिढीतले मतभेद ज्याला आपण जनरेशन गँप म्हणतो ते तसेच रहातात आणि मग बरेचदा घरातल्या मोठ्या माणसांची मनं जपण्यासाठी आयुष्याची गाठ इच्छेविरुध्द किंवा भावनिकतेने झुकुन बांधली जाते.पण मग अश्याप्रकारचे लग्न यशस्वी ठरतात का? लग्न हे दोन परिवारांच्यात होते म्हणले तर खोटे ठरणार नाही.त्यामुळे दोघांनीही घरच्यांना सोबत घेऊन निर्णय घेतला तर संसार आनंदी होतो.मोठ्यांची मनं सांभाळता आली व विश्वास कमानला की काही गोष्टींकडे दुर्लक्ष होते व काही गोष्टी ते आपल्यासाठी सोडतात.

अनिकेतने आईला विचारले,”तु खुप भारी होतीस म्हणुन तुला जमलं हा सगळं सांभाळण…मला अनयाला तुझे उदाहरण सांगुन विचारावे लागेल की जमेल का ग बाई तुला असं सहज शक्य…” अनिकेतचे ऐकुन सुलभाताई खुष झाल्या,”बघा बोलुन…पण संसार हा स्वत:चा स्वत:सारखाच करावा हा…त्याची गोडी जास्त असते…”असं म्हणत त्याला अनयाशी भेटायला परवानगी दिली. काही नाती ही कोणालाही न दुखवता जपली जाऊ शकतात,पण हवी असते ती मनापासुन नातं जपण्याची इच्छा व मनाचा मोठेपणा…दोन्हीही पिढींकडुन व दोन्ही पक्षाकडुन.

भूमिका पालकांची…

नमस्कार! लग्न आणि लग्नाच्या आजूबाजूचे सारे महत्वाचे घटक याबाबत आपण सांगतच आहोत, पण यात सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे पालकांची भूमिका. अर्थात, हे जर ३०-४० वर्षांपूर्वीच लग्न असतं, तर एकत्र कुटुंब पद्धतीमुळे हा निर्णय फार सोपा असायचा. ‘ मोठ्या ‘ माणसांच्या निर्णयाला तितकं मान असायचा, खात्रीशीर स्त्रोतांकडून चौकशी, माणूस अचूक हेरण्याची कला, व्यावहारिकता यामुळे लग्नाचे निर्णय चटपट व्हायचे. लग्नही व्हायची. आणि अर्थात ती टिकायचीपण! फार क्वचित एखादं लग्न मोडायच.

आता परत वर्तमानात. वर लग्न झालेली हीच पिढी आता पालक आहेत आणि त्यांच्यावरही आज तोच प्रसंग आहे. आपल्या मुलांना उत्तम आणि अनुरूप जोडीदार मिळवून देण्याची. इथे फक्त एक वेगळं आहे. लग्न करणारी पिढी आता पूर्वीसारखी नाहीये. त्यांना फक्त स्वतःचे विचार नाहीत, तर ते मांडण्याची धमक पण आहे. थोडीची अवखळ, निडर, आत्मविश्वासाने भरलेली अशी. अशा या पिढीला उत्तम दिशा दाखवली, तेही त्यांच्या कलाने तर ती कुठच्या कुठं निघून जातात. करीयर असो किंवा लग्न, सर्वच ठिकाणी प्रगती करतात, आनंदाने जगतात. अशावेळी मनाला न पटलेला एखादा निर्णय पूर्ण आयुष्याला वळण देण्यास कारणीभूत ठरल्याची अनेक उदाहरणे आपल्यासमोर आहेत. प्रत्येक पालकाला याची काळजी आहेच, यात शंका नाही.

विशेषकरून लग्नाच्या बाबतीत लग्न करण्याची इच्छा, इथपासून सुरुवात असते. अशावेळी योग्य वयात, जितकं पाल्याच्या नकळत याविषयी बोलण्याची सुरुवात केली, तर त्यांची लग्नाची तयारी उत्तम होते. जितका लग्नाचा ससेमिरा जास्त, तितकी ही पिढी दूर पळते. लग्नामुळे आपलं स्वातंत्र्य दुरावत की काय, ही एक भावना त्यांच्या मनात असते.

एक पालक म्हणून त्यांना तुम्ही तुम्हाला न मिळालेली प्रत्येक गोष्ट देण्याचा प्रयत्न केला आणि आपापल्या परीने दिलीसुद्धा. कदाचित आपल्या काळात आपल्या मतांना, निर्णयाला इतकं स्वातंत्र्य नसेल, म्हणून तेही आपण त्यांना दिलं. तरीही आज कालच्या बहुतांश पालकांचं हेच मत असतं ( अगदी उघडपणे, तुझ्या आवडीच्या जोडीदाराशी लग्न कर, अस म्हटलं तरी मनाचा एक कोपरा सांगत असतो, की आमचं पण मत घ्यावं ) की सगळे निर्णय तुझ्या आवडीने जरी घेतलेस, तरी लग्न आमच्या मताने होणार. आता याचे बरेच पैलू आहेत. काही पालकांना वाटत असतं की आपला मुलगा किंवा मुलगी इतकी सक्षम नाही. काहींना वाटतं की आपल्या घराण्याला शोभेल असं स्थळ मिळेल किंवा आवडेल का? बऱ्याचदा मुला- मुलींच्या अपेक्षा माफक असतात. पण आई वडिलांच्या इच्छेमुळे एखादं खूप आवडलेल स्थळाला नाही सांगावं लागत. तुझ्यात काय कमी आहे, मिळेल याहून चांगलं स्थळ, अस म्हटलं की पालकांचं निभावत. पण खरंच त्या मुलांच्या जागेवर जाऊन आपण विचार करू शकतो का, हे फार महत्त्वाचे आहे.आजची पिढी तुमचं नक्कीच ऐकेल, पण त्यांना आयुष्यातला हा महत्वाचा निर्णय घेण्यासाठी मदत करा, लादू नका. कारण आज तुमचं ऐकून ते कदाचित लग्न करतीलही पण आयुष्य जाईल त्यांना लग्न आणि त्यातला आनंद शोधण्यात. आम्हाला नक्की खात्री आहे, एका जबाबदार पालकपेक्षा एक व्यक्ती म्हणून याकडे तुम्ही त्रयस्थपणे पहाल. मग बघा, तुम्हाला पटतं का नाही. आणि आम्ही आहोतच तुमच्या सोबत.

Download Sthal Marathi Matrimony App Now

Download the app and create your profile for FREE.
Find your compatible life partner with Sthal Marathi Matrimony

Sthal Matrimony Mobile App

Need help with registration?

+91 7666904146